Saturday 27 December 2014

Athavaninchi Sathavan

                 आजच दुपारी बाबांचा फोन आला आणि त्यांच्याकडून दिलीपकाकांच्या बद्दल कळाले…. गेल्या कितीतरी वर्षात मी त्यांना भेटलेही नव्हते पण तरीही ते गेल्याची बातमी ऐकून खरच खूप सुन्न व्हायला झाले… खरतर ते बाबांचे मित्र आणि काही काळ आमचे भाडेकरू पण… त्यांना माझ्याबद्दल प्रचंड जिव्हाळा आणि प्रेम… नंतर शिक्षणात आणि कामात busy झाल्यामुळे संपर्क हळू हळू कमीकमी झालेला… पण तरीही वाटणारे प्रेम मात्र अगदी तसेच…

                  मग विचारांचा ओघ सुरु झाला… आणि माझ्या बालपणात आपापल्या मायेचे घट्ट धागे गुंफाणाऱ्यांची आठवण एका मागोमाग एक येऊ लागली… दिलीप काका, बाबांचे एक कामगार जाधव काका, मेसवाल्या काकू, एक जुन्या भाडेकरू कला काकू, अजून एक भाडेकरू भालू काका …. पण विचारांचा ओघ थोडा कमी झाल्यावर अचानक असे लक्षात आले कि यातील बरीच मंडळी काळाच्या पडद्या आड गेली आहेत…. मग मात्र खूप एकटे वाटू लागले विनाकारण डोळे सतत भरून येऊ लागले… आवाज जड होऊ लागला….

                 जरा  सगळे परत स्थिर झाल्यावर कारण शोधण्याची धडपड सुरु झाली…. बराच विचार केल्यावर लक्षात आले कि हि सगळी माणसे कितीतरी वर्षात आपल्याला भेटली नाहीत म्हणून आपले कुठेच अडले नवते… पण तरीही न भेटता न बोलता आमचे नाते relation मात्र खूप छान होते… या सार्यांनी माझ्या अगदी निर्व्याज प्रेम केले अगदी कसलीही अपेक्षा न ठेवता…. म्हणून कदाचित हि सारी नाती मला खूप प्रिय होती आणि आजही आहेत… आणि आता इतके दुख याचेच होत आहे कि आपल्यावर असे घट्ट प्रेम करणारी माणसे मात्रे हळू हळू चालली अहेत…. मला अगदी एकटे किंवा काही अंशी पोरके करून… हे दुखते आहे …. खोल कुठे तरी…. हे धागे सुटत आहेत… माझी मात्र धरून ठेवायची फोल धडपड सुरु आहे….

Missing You All

Thursday 25 December 2014

Today - The best X-mas


            आज सकाळीच माझं पिल्लू मस्त गोड साखरझोपेत  होते आणि माझ्या नवर्याने संताक्लोजची टोपी आणि मुखवटा घालून तिला उठवले इतक्या आनंदाने ती हसत उठली त्यानंतर आवडते चोकोलेट…. जाम खुश स्वारी … आता सुट्ट्या लागल्या आहेत ना… तिला बिलकुल अपेक्षा नव्हती अशा सकाळीची… आज आम्ही तीघेपण खूप खुश आहोत .

            खरच किती छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद आपण घेऊ आणि देऊ शकतो… पण या गोष्टी मन दुखावताना का लक्षात येऊ नयेत…. मला बर्याचदा असे वाटते कि आपण अनोळखी किंवा फक्त तोंड ओळख असणार्यांशी चांगले आणि सुहृदतेने वागतो पण जवळच्या आपल्या अशा माणसांशी कधी कधी कारण नसताना कठोरतेने वागतो…. कदाचित जवळचे आहेत समजून घेतील या भ्रमात आपण असतो… पण या सर्व गोष्टी मनात कुठे तरी खोलवर रुजत असतात आणि साठत असतत… एखादे गढूळ पाण्याचे डबके साचावे तसे…. आणि मनातल्या मायेवर, प्रेमावर शेवाळाचा थर  चढवतात. नव्या लिखाणाबरोबर खरच साऱ्यांची मने जपण्याचा छोटासा प्रयत्न मी तरी सुरु केला आहे.